भाट्ये समुद्रात बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी:– रत्नागिरीत रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जनाला रविवारी रात्री गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडल्याची घटना घडली. या दोघांचा शोध रात्री उशिरा पर्यंत सुरू होता. रात्री उशिरा शोध मोहीम रात्री उशिरा थांबवण्यात आली. 
 

आज सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. सोमवारी सायंकाळपर्यंत शोध सुरूच होता. मात्र सोमवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचे मृतदेह सापडले आहे. पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासन ग्रामस्थांनि ह्यात मोठी मदत केली.