रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 59 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 1559 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
जिल्ह्यात 24 तासात 70 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 011 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.02 टक्के आहे. नव्याने 59 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 123 इतकी झाली आहे.
कोरोनाने 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 426 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 370 तर संस्थात्मक विलगीकरणात 316 रुग्ण उपचार घेत आहेत.









